Share

‘या’ कारणामुळे अजित पवार यांनी केले आनंदी गोपाळ या चित्रपटाचे कौतुक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलावंतांनी आपली ठळकपणे मोहर उमटवून महाराष्ट्राचा गौरव वाढवल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, दिग्दर्शक भीमराव मुडे दिग्दर्शीत ‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ गाण्यासाठी सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयाबद्दलचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझाइनर सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ हे उत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे.

‘ताश्कंद फाईल’ हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरल्या आहेत. दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्या ‘कस्तुरी’ हिंदी चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक विवेक वाघ यांचा ‘जक्कल’ मराठी चित्रपट उत्कृष्ट संशोधनात्मक नॉन फिचरफिल्म पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!