टीम महाराष्ट्र देशा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणली. पण विरोधी सहकार बचाव पॅनलला हा निर्णय मान्य नाही. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर आणि दहशतीच्या बळावर निवढणूक जिंकल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे.
सत्तेच्या माध्यमातून अजित पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली आहे. या निवडणुकीत ५० कोटी वाटले असल्याचा आरोपही रंजन तावरे यांनी अजित पवारांवर केला आहे. दरम्यान, रंजित तावरे यांनी केलेल्या आरोपांवर अजून अजित पवारांची कोणतेही स्पष्टीकरण आलेली नाही.
तावरे म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत सत्तेचा प्रचंड गैरवापर केला. तब्बल सहा दिवस उपमुख्यमंत्री बारामतीत होते. त्यांनी मतदारांना दमदाटी केली. कोणाला नोकरीवरून काढू, कोणाचं पाणी बंद करू, अशा धमक्या दिल्या असल्याचंही तावरे यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –


