मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर यांच्यावर प्रतिक्रिया देताना सीएए आणि एनपीआर विरोधी प्रस्ताव विधानसभेमध्ये आणण्याची गरज नसल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सध्या सीएए आणि एनपीआर यावरून दिल्ली पेटली आहे. दिल्लीमध्ये तणावग्रस्त स्थिती पाहता राज्यातील सुरक्षा आणि कायद्याची स्थिती सुरळीत ठेवण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यातील लोकांनी सीएए आणि एनपीआर, एनआरसीवरून घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. सरकार याबाबत जनतेचे हित लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दरम्यान दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएएला घाबरण्याची गरज नाही. हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचे म्हटले होते.


