Share

Aditya Thackeray । “माझ्याशी समोरासमोर चर्चेला या,” आदित्य ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना खुलं आव्हान

Published On: 

Aditya Thackeray । मुंबई : C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ (Tata AirBus Project) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. IAF सौद्यांतर्गत महाराष्ट्रात सुरू होणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमधील वडोदरा येथे स्थलांतरित झाला आहे. हा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. मात्र हा प्रकल्प महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यानंतर यावर आता पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू मांडली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया-

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले कि, विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. उद्योगांना आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या नाहीत. त्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले, असं ते म्हणाले. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असं भासवलं जातंय. पण या प्रकल्पांसंदर्भात महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले, असं फडणवीस म्हणाले. पुढे महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून विकसित केलं जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी केलीय. त्यानुसार राज्यात प्रकल्प यायला सुरुवात झालीय. लवकरच राज्यात टेक्ससाईल पार्कदेखील येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया –

आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.आपल्या राज्यातील जे उद्योग येऊ शकत होते ते आता निघून चालले आहेत. आम्हाला गाजर दाखवलं होतं की, वेदांता-फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रोजेक्ट राज्याला मिळणार आहे. आकड्यांच्या खेळात माहिर असलेल्यांनी पुन्हा हा खेळ केला आहे.

रायगडचा २० हजार कोटीचा पल्प आणि पेपर प्रकल्प आम्ही आणल्याचं त्यांनी सांगितलं. पण २३ मे २०२२ मध्ये आम्ही दावोसमध्ये असतानाच याचा एमओयू साईन झाला होता. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात आला होता. पण आता तो त्यांनी आम्ही आणल्याचं दाखवलं आहे. या सर्व कामांमध्ये त्यांनी क्रेडिट घेतलं आहे. आजवर मी कधीही इतकं खोटं बोललेलं ऐकलं नव्हतं. फडणवीस खोटं बोलतायत. फडणवीसांना जी माहिती मिळाली ती चुकीची आहे, असा गंभीर आरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!