टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरनामुळे लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. याचा सर्वात जास्त फटका हा गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या घटकाला बसला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात धान्य उपलब्द करून दिलं आहे.
परंतु केंद्र आणि राज्य सरकारकडून जाहीर केलेल्या लाभाचा फायदा या घटकाला होत नसून रेशन वितरण करणाऱ्या दुकानदारांकडून काळाबाजार केला जात असल्याच्या घटना अनेक घडल्याच्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये आले होते .
आता याबाबत राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उचलला गेला आहे. याबाबतची माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे.
‘#लॉकडाऊनमध्ये रेशन धान्य वाटप करताना अनियमितता, नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे, ८७ रेशनदुकानांचे निलंबन तर ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द. शिवभोजन थाळींची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती’
#Lockdown मध्ये रेशन धान्य वाटप करताना अनियमितता, नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे, ८७ रेशनदुकानांचे निलंबन तर ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द. शिवभोजन थाळींची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय – अन्न, नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती pic.twitter.com/JFTqdLVapE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 23, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

