नवी दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. स्पर्धेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा ही अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.
यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका बसण्याची शक्यता आहे. ३० मेपर्यंत पूर्ण होणारी आयपीएल मध्यावर स्थगित करावी लागली. ५२ दिवसांच्या स्पर्धेत एकूण ६० सामने होणार होते. त्यापैकी २४ दिवसांचा खेळ झाला आणि २९ सामने शक्य झाले. साधारणतः दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात म्हणजेच २२०० कोटींचे नुकसान आम्हाला होऊ शकते, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे संकेत मार्चच्या अखेरीस मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याच सुमारास ब्रिजेश पटेल अध्यक्ष असलेल्या समितीने कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास आयपीएल संयोजनात अडचणी येतील, त्यामुळे स्पर्धा अमिरातीत घेण्याची सूचना केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात निकाल
- ‘कोरोनाविरु द्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या’ भाजप खासदारानंतर नेटीजन्सच्या मागणीला जोर
- बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला खेळाडुच्या मृत्युचा उल्लेख; अश्विनच्या प्रतिक्रियेनंतर ट्विट हटवले
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा होणार विराजमान
- ‘ड्रॅगनचे पाप, जगाला ताप; चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे तडाखे जगाला नेहमीच बसतात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

