🕒 1 min read
सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, रणजितसिंह मोहिते – पाटील आणि कालिदास कोळंबकर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मंत्रीमंडळातील प्रवेश नक्की मानला जात आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणूकीपुर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता़ त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्या प्रचारार्र्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूज शहरात पार पडली़ या सभेला विराट जनसमुदाय गोळा करून मोहिते-पाटील परिवाराने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर लोकसभा प्रचारात अकलूजमधून १ लाख मताचा लीड रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मिळवून देऊ असेही मोहिते-पाटील परिवाराने सांगितले होते त्यानुसार एक लाखांच्या वर लीड मोहिते-पाटील यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन करण्यातही मोहिते-पाटील परिवाराने कुठेही कसर ठेवली नाही. या एकूणच कामगिरीवरून रणजितसिंह मोहिते-पाटीलांची मंत्रीमंडळातील वर्णी १०० टक्के खरी मानली जात आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
