Share

पराभवानंतरही भाजपच्या ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रीपद

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सर्वत्र नरेंद्र मोदींची त्सुनामी आपल्याला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे राज्यात युतीचे ४१ उमेदवार तर महाआघाडी चे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विरुद्ध कॉंगेसचे बाळू धानोरकर अशी चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा दारूण पराभव केला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जन्मगावात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळ गाव असलेल्या चंद्रपुरात भाजपचा पराभव करणारे बाळू धानोरकर हे कॉंगेसचे एकमेव उमेदवार आहेत.

या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने त्यांना मंत्रीपद मिळणार का?, अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला नितीन गडकरींनी पूर्णविराम दिला आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला असला तरीही त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात येईल’, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. त्यामुळे हंसराज अहिर यांना कोणते मंत्रीपद मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी त्याला सुरंग लावत हंसराज अहिर यांचा पराभव केला .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!