🕒 1 min read
औरंगाबाद : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सिडकोचा पाणीप्रश्न मांडला. सिडकोतील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी काय काय केले पाहिजे याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
माजी सभापती राजू वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शहरप्रमुखांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता धांडे, उप अभियंता पदमे, कनिष्ठ अभियंता चौधरी, तसेच शिवसेना उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल आदी उपस्थित होते. सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. या बैठकीत टँकर गाडीचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी सिडको एन-५ येथे गतिरोधक टाकण्यात यावे, प्रतापगड नगर येथील विहिरीचा पाईपलाईनचे काम थांबले आहे ते त्वरित पूर्णत्वास न्यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यासोबतच एन-८ इथे पाण्याचा व्हॉल्व खराब झाला आहे. तो लवकरात लवकर बदलावा, सिडको एन-७ येथील पाणी पुरवठ्याचा गॅप कमी करावा, एन-६ येथील पाण्याच्या टाकीवर गैरप्रकार घडतात ते टाळण्यासाठी देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यासाठी कमीत कमी कायमस्वरूपी एक सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यावर कार्यकारी अभियंता धांडे यांनी सर्व विषयांवर त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
