🕒 1 min read
नागपूर : यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्येने दुहेरी संख्या गाठल्यानंतरच परिस्थिती गंभीर झाली होती. आता तिसरी लाट उंबरठ्यावर असताना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच कडक निर्बंध लावावे लागतील. परंतु हे निर्बंध एकाएकी न लावता सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे परत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. गेल्या दीड महिन्यापासून एक आकडी असलेली रुग्णसंख्या आता दुहेरी झाली आहे. ही धोक्याची सूचना आहे. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शेवटी जबाबदारी माझी आहे. लोकांचे जीव जास्त महत्त्वाचे आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल सूचना व माहिती केंद्र व राज्य सरकारला पाठवली आहे. या संबंधात केंद्राकडून राज्याला मार्गदर्शक सूचना येईल. त्या नंतर राज्याच्या गाईड लाईन आल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. कडक निर्बंधाच्या घोषणेवर व्यापारी संतप्त आहेत. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्र्यांची माहिती
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- ‘नीलम गोऱ्हे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार होत असताना आता कोठे आहेत ?

