Share

“…तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू”, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळाले. तद्पश्चात राणा दाम्पत्यास अटक झाली. तसेच याप्रकरणी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात आज (२५ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘किती द्वेष करायचा? हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो?’, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच जर हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू. लावा आमच्यावर राजद्रोह’, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले, ‘नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाणीव करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!