🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात भाजपकडून निदर्शने सुरु आहेत. नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे. तसेच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
या सगळ्या प्रकरणावर नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काहीही बोललो नाही. मी ज्या मोदींचा उल्लेख केला तो गावगुंड आहे. मात्र, भाजप मोदी नावावरुन विनाकारण रान उठवून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे. आता काँग्रेसच भाजपविरोधात तक्रार दाखल करेल, असे नाना पटोले यांनी म्हटले.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणतात, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडी देवींची उपमा दिली म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांनी लगेच तुरुंगात टाकले. मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे पळाले, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
-
पटोलेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा, त्यांना तात्काळ अटक करा- डॉ. भागवत कराड
-
“गावगुंड असेल तर, त्याची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा”, केशव उपाध्येंचे पटोलेंना आव्हान
-
श्रेयस तळपदेच्या हिंदी आवाजावर अल्लू अर्जून फिदा! मानले आभार; व्हिडिओ व्हायरल
-
राज्यातील नेत्यांना शाब्दिक घाण करण्याची सवयचं! पटोले, राणे, दानवे…एकाच रांगेत
-
डॉ. कल्याण काळे काँग्रेसचे कि भाजपचे? सेवा दलाच्या औताडेंचा आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
