Share

पाकिस्तानने भारतला हरवले तर खेळाडूंना मिळणार ब्लँक चेक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 ची धूम सुरू झाली आहे, कारण या मेगा इव्हेंटसाठी संघांनी यूएई आणि ओमान गाठणे सुरू केले आहे. बीसीसीआयने यजमान यूएई आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषकाचे आयोजन केले आहे. तर येत्या 24 ऑक्टोबर रोजी दुबई मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामान खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी एक अजब दावा केला आहे. पाकिस्तानच्या संघाने जर टी -20 विश्वचषकात भारताचा पराभव केला तर पीसीबीला गुंतवणूकदाराकडून रिक्त चेक मिळणार असल्यानं त्यांनी म्हंटल आहे.

पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा म्हणाले की, ‘एका गुंतवणूकदाराने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आश्वासन दिले आहे की, जर पाकिस्तान भारताविरुद्धच्या टी -20 विश्वचषक सामन्यात आपला पहिला विजय नोंदवू शकला तर बोर्डला त्या गुंतवणूकदाराकडून रिक्त धनादेश मिळेल. पुढे ते म्हणले, ‘पीसीबी आयसीसीच्या 50 टक्के निधीवर चालते. आयसीसीचा 90 टक्के निधी हा भारताकडून येतो. मला भीती वाटते की जर भारताने आयसीसीला निधी देणे बंद केले तर पीसीबी कोसळू शकते. कारण पीसीबी शून्य टक्के निधी देते. असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

पाकिस्तानमध्ये बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही, तर पीसीबीला न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या नियोजित मालिकेपासून मोठ्या आशा होत्या. मात्र या दोन्ही संघांना आपापल्या दौऱ्यातून माघार घेतल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामागे सुरक्षेची कारणे सांगितली गेली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!