Share

‘ईडीने कारवाई करावी, मात्र भाजप नेत्यांनी आरोप केल्यानंतर ते कारवाई करत असतील तर याचा अर्थ…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

परब यांच्यासह शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या देखील ईडीच्या रडारवर आहेत. ईडीचे धाड सत्र सुरु असून अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी यांच्यासह एकनाथ खडसे या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. या सर्व घडामोडींवरून भाजपवर महाविकास आघाडीतील नेते आरोप करत असून केंद्र सरकारच्या मदतीने ईडीचा गैरवापर केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने घडत आहे, असं म्हणत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावरून भाजपवर शरसंधान साधले. ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होणे याचे त्यांना अधिकार असतील तर त्यांनी कारवाई करावी परंतु ज्या पद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत आणि कारवाई होत आहे, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!