🕒 1 min read
मुंबई : सुप्रीम कोर्टाने राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शाळेतील १५ टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोरोना काळात केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याचे निर्देश दिले होते. त्या आधारावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील फी कपातीचे संकेत दिले होते.
दोन आठवड्यांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत फी कपातीच्या निर्णयाला मंजुरी देखील देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अधिसूचनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अध्यादेश काढण्यावरून काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे आरोप करत राज्य सरकारचाच फी कपात करण्यास विरोध असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.
फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण??? मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे अन्यथा आम्ही हे बिंग फोडू… pic.twitter.com/yMf6WJeTKe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 12, 2021
याबाबत आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. फी कपातीच्या चांगल्या आणि पालकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या निर्णयाला विरोध करणारे मंत्री कोण हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं अन्यथा आम्ही ते बिंग फोडू, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. ‘फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यानी जाहीर करावे अन्यथा आम्ही हे बिंग फोडू…’ असं म्हणत त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यसभेत महिला खासदारांना मारहाण, ही लोकशाहीची हत्या’,राहुल गांधींचा आरोप
- ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात – प्रणिती शिंदे
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
- Eng vs Ind : काही वेळातच दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात ; दोन्ही संघ ‘या’ मोठ्या बदलांसह उतरणार मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
