🕒 1 min read
मुंबई : भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा समिश्र ठरला. मोठ्या कालावधीनंतर भारतीय महिला संघाला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने एक कसोटी आणि ३ एकदिवसीय व टी-२० सामने खेळले.
य दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने फॉलोऑननंतर जोरदार पुनरागमन केले आणि सामना अनिर्णीत राखला. भारताकडुन पदार्पण करणारी शेफाली वर्मा कसोटी सामन्याची हीरो ठरली. यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. मात्र अखेरचा एकदिवसीय सामना जिंकत इंग्लंडमध्ये विजयाचे खाते उघडले. तर टी-२० मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात जोरदार पुनरागमन केले. आणि सामन्यात बरोबरी केली. मात्र अखेरच्या सामन्यासोबत मालिका गमावली.
इंग्लंड दौऱ्यातील एकुण सात सामन्यापैकी भारतीय संघाने दोन सामन्यात विजय मिळवला तर एक सामना अनिर्णीत राखला. कसोटी मालिकेत शेफाली वर्माने सर्वाधिक १५९ धावा केल्या तर स्नेह राणाने ४ गडी बाद केले. तर एकदिवसीय मालिकेत कर्णधार मिताली राजने २०६ सर्वाधीक धावा केल्या तर टी-२० मालिकेत स्मिती मंधानाने ११९ धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाचा इंग्लंड दौरा निराशाजनक राहीला.
महत्त्वाच्या बातम्या
- सुशांतच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा कारवाईस नकार ; सुचवला नवा मार्ग
- ‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’ ; फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
- ट्वीटरवर अंकुश आणून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही – नवाब मलिक
- अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त


