Share

‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू’; भाजप नेत्याची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ओबीसी समाजासह भाजप आक्रमक झाला असून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तर, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली असता केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

दरम्यान, भाजपने आता काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘इम्पेरिकल डाटा’बाबत ट्विट करून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. तसेच ‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू’ असा टोला देखील उपाध्येंनी लगावला आहे.

‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार केंद्राकडे बोट दाखवतात तर सचिन सावंत काही पत्राकडे बोट दाखवतात अहो पण एसईसीसीचा डेटा हा 50 टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली. पण, 2013 रोजी त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील,’ असा मुद्दा केशव उपाध्ये यांनी समोर मांडला असून यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या लिंक देखील दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!