🕒 1 min read
मुंबई : संपुर्ण क्रिकेट जगताना उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. हा सामना १० दिवसावर ठेपुन आला आहे. भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. यादरम्यान भारतीय संघासाठी मनोबल वाढवणारी एक घटना घडली आहे.
या वर्षी सुरुवातीला भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळवलेल्या विजयाचा आयसीसीने विशेष गौरव केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ला आयसीसीने ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’चा सन्मान दिला आहे. आयसीसीने ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. आयसीसीने सोशल मीडीयाद्वारे यासाठी मते मागवली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ला ७ मिलीयन मते मिळाली.
Ahead of the #WTC21 final, we set out to determine #TheUltimateTestSeries.
After 15 head-to-heads and over seven million votes across our social channels, we have a winner…
The 2020/21 Border-Gavaskar Trophy takes the crown ???? pic.twitter.com/IvpjCxQ2eJ
— ICC (@ICC) June 8, 2021
दोन आठवड्यापुर्वी आयसीसीने ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’ हा मान देण्यासाठी १६ मालिकांची निवड केली होती. या १६ मालिकातुन भारत-ऑस्ट्रेलिया २००१ आणि २०२०-२१, भारत विरुद्ध पाकिस्तान १९९९ आणि ऍशेस २००५ या मालिका अंतिम चार मध्ये पोहोचल्या होत्या. भारत-ऑस्ट्रेलिया २०२०-२१ आणि भारत विरुद्ध पाकिस्तान १९९९ मालिकने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२०-२१ ने ‘द अल्टिमेट टेस्ट सिरीज’ चा मान पटकावला.
महत्वाच्या बातम्या
- वजन कमी तर पैसे जास्त; नव्या चित्रपटासाठी बेबोने मागितली इतकी रक्कम
- ७९ लाख दहा हजार दोनशे साठ रुपये रुग्णांना परत करा, रुग्ण हक्क संघर्ष समितीची मागणी
- कोल्हापुरात सर्वच व्यापारी-दुकानदारांना अनुमती द्या, अन्यथा…; धनंजय महाडिकांचा इशारा
- देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं ; अशोक चव्हाणांचा टोला
- लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
