🕒 1 min read
औरंगाबाद : विद्युत विभागाकडून वारंवार पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांच्या तक्रारीवरुन तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी महावितरणचे अधिकारी व नपच्या नगरसेवकांची मंगळवारी दि.११ बैठक आयोजीत करत. यापुढे पंपहाऊसचा विजपुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता महावितरणने घ्यावी असे आदेश या बैठकीत तहसिलदारांनी दिले. या बैठकीत बोलतांना नगरअध्यक्ष सुरज लोळगे यांनी महावितरणच्या अधिकारी व लाईनमनच्या तक्रारीचा पाढाच वाचला केवळ महावितरणच्या आधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे स्पस्ट केले.
सद्यस्थीतीत सर्वच विभागाचा महावितरणचा विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याने, शहरात विजेचा प्रश्न निर्माण झालेला असुन कधीही शहरातील विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याची तक्रार महेश जोशी यांनी यावेळी बोलतांना केली. यावेळी पाणीपुरवठा सभापती अजीत पगारे, शिवसेनेचे गटनेते तुषार पाटील, राकॉंचे गटनेते कल्याण भुकेले, काँग्रेसचे गटनेते हसनोद्दीन कठ्यारे, नगरसेवक प्रकाश वानोळे, ज्ञानेश घोडके, नगरसेविका पुष्पा वानोळे, कृष्णा मापारी, अस्लम पठाण, सम्राट वानोळे, पाणीपुरवठा निरीक्षक व्यांकटी पापुलवाड, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंढे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक माने, उपअभियंता कल्याण रंधे, जायकवाडीचे अभियंता शंकर वाघ, शाखा अभियंता रोहीत तायडे आदींची उपस्थीती होती.
यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक माने यांनी सांगीतले की सध्या रमजानचे दोन दिवस गेल्या त्यानंतर विशेष असे मनुष्यबळ वापरुन पाणीपुरवठा विभागाला जोडणा-या विद्युत सप्लायच्या मार्गातील सर्वच आडथडे दुर करुन पाणीपुरवठा विभागाचा विद्युतपुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता महावितरण घेईल तसेच ईद होईपर्यंत पंपहाऊसचा विद्युतपुरवठा खंडीत होणार नाही याची पण दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन माने यांनी महावितरणच्या वतीने दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…


