औरंगाबाद : एकीकडे पैठण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन एकजुटीने कोरोनाचा सामना करत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्ण व क्वॉरांटाईन केलेल्या व्यक्तींना जायकवाडी येथील प्रबोधिनी येथे तयार केलेल्या कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात येते. तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे कक्षातील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पैठण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात देखील कोरोनाने शिरकाव केल्यामुळे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना जायकवाडीतील प्रबोधीनी या ठिकाणी ठेवण्यात येते. मात्र येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले.
त्याचप्रमाणे या ठिकाणी घाण, पिपिई किट, जेवणाच्या पंतरवाळी असा कचरा सर्वत्र पसरलेला दिसून येत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यामध्ये वेळीच सुधारणा करून रूग्णांना चांगली सेवा द्यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांसह रुग्णांनी केली आहे.
दरम्यान, कोरोना ग्रस्त रुग्णांनीच त्रास होत असल्याने शेवटी मनाचा मोठेपणा दाखवत सर्व परिसर स्वच्छ करुन सेंटर वरील सर्व कचरा काढून टाकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…


