Share

‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : कोरोना सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कार्यपद्धतीत काही त्रुटी असतील तर विरोधकांनी टीका करण्याऐवजी सल्ला दिला पाहिजे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. लखनऊचे खासदार असलेल्या राजनाथ यांनी आपल्या मतदारसंघातील हज हाऊसमध्ये एचएएलने तयार केलेल्या २२५ खाटांच्या कोविड केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना राजनाथ यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.

उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाविरोधी लढ्यात उल्लेखनीय काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील योगी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. मला मान्य आहे की, काही त्रुटी असतील. शेवटी जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात. मात्र ही राजकारणाची वेळ नाही. त्रुटींवर टीका करण्याऐवजी त्या दुरुस्त करण्यासाठी सल्ला दिला पाहिजे, असे राजनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाला आव्हान म्हणून स्वीकारले आहे आणि त्यावर मात करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन इतर देशांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. मोदी सरकारच्या या मुत्सद्देगिरीचे फलित म्हणूनच आज आपल्याला जागतिक समुदाय मदत करत आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. राजनाथ सिंहांनी यापूर्वी लखनौमध्ये डीआरडीओच्या मदतीने ४५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!