Share

आता कुठे गेले अंध भक्त? मोदींनी उद्धव ठाकरेंचे कौतुक करताच स्वामींचा टोला

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारकचं कौतुक करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. यानंतर आता सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता नीती आयोगानंही उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर स्तुतीसमनं उधळली आहेत.

मुंबईचं कोविड व्यवस्थापन हे प्रेरणादायी असल्याचं ट्विट नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलं आहे.तर दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते मात्र राज्य सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना भाजपचे जेष्ठ नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे तसेच भाजप नेते आणि समर्थकांना खडेबोल देखील सुनावले आहेत.

स्वामी म्हणाले, म्हणाले, की पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रवक्त्यांनी आज मुंबई कोरोना विषाणूच्या धोक्यातून निसटल्याबद्दल कौतुक केले आहे. आता असे दिसते की उद्धव ठाकरे एक रोल मॉडेल मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत. मी हे पहिल्यांदा देखील म्हणालो होतो. त्यानंतर अंध आणि गंध भक्तांनी आरडाओरड सुरू केली होती. आता ते अंध आणि गंध भक्त कुठे आहेत? पुन्हा शहरातील गटारात का?अशी चपराक त्यांनी लगावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!