🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून नाका बंदी करण्यात येत आहे. त्यात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे. सोमवारी महात्मा फुले चौकात मौतीवरून आलो अशी बतावणी करत कपडे आणायला जाणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजीम अजीम पटेल वय २३ रा. प्रिया कॉलनी पडेगाव असे तरुणाचे नाव आहे.
महात्मा फुले चौकात क्रांती चौक पोलिस ठाण्यांतर्गत नाका बंदी करण्यात आली आहे. दुपारी दोन जन दुचाकीवरून जात असताना. पोलीस नाईक भोकरे यांनी त्यांना अडवले. आणि कोठे जात आहे. अशी विचारणा केली, त्यावर त्यांनी मौती वरून येत असल्याचे सांगितले. तिथेच असलेल्या फौजदार गायकवाड यांना त्यांच्या गाडीला लागलेली नवीन कपड्यांची पिशवी नजरेस पडली.
त्यावर, फौजदार गायकवाड यांनी त्या दोघांना पुन्हा विचारणा केली. तर त्यांनी औरंगपुरा येथून कपडे आणल्याचे सांगितले. त्यांनी कपड्याची विक्री करणाऱ्याला कॉल केला असता. त्याला पोलिसांनी पकडल्याचे समजताच फोन बंद करून धूम ठोकली. त्यानंतर दोघांपैकी नजीमवर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- शहरात जोरात नाका बंदी तरीही तीन दुचाकी चोरीला
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- विद्यार्थिनीने फी न भरल्याचे सोशल मीडियावर सांगितले, शिक्षिकेवर अॅट्रोसिटी
- लवकरच पुरेसा रेमडेसिवीरचा साठा होणार उपलब्ध, सात रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांशी चर्चा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

