Share

दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक

Published On: 

🕒 1 min read

जालना : साष्टपिंपळगाव येथे गेल्या ५० दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या वतीने आज साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार होती. मात्र बारामतीला निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. राज्य सरकार आंदोलनाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे थेट शरद पवार यांच्या कानावर हा विषय थेट घालण्यासाठी बारामतीत आंदोलकांची रॅली जाणार होती.

मात्र बारामतीला प्रस्थान करण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदेलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर बळजबरीने अटक करण्यात आली. यात मनोज जरांगे पाटील, संजय कटारे, शहादेव औटे, संपत शिंदे, दादासाहेब राक्षे, सुनिल औटे, दादासाहेब बोचरे यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन आम्हाला अटक करत आहात का? असा सवाल यावेळी आंदोलकांची उपस्थित केला.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. येथील आंदोलनाला सरकार गांभिर्याने घेत नसल्याने मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढून बारामतीमध्ये जाऊन पवार यांच्याकडेच हट्ट धरला जाणार असल्याचे साष्टपिंपळगाव आंदोलकांनी ठरवले होते. मात्र ही रॅली निघण्यापुर्वीच पोलिसांनी आंदोलकाना आटक करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!