Share

शहराच्या विविध भागात चौघांची आत्महत्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणाऱ्या चार जणांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या चारही घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

शिवाजी आसाराम कोथमिरे (वय 60, रा. सिंहगड कॉलनी प्रफुल हाउसिंग सोसायटी, सिडको, एन-6) यांनी गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एचएमटी कंपनी तुन सेवानिवृत्त झालेले शिवाजी कोथमिरे हे गेल्या काही वर्षापासून आजारी होते.

आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. दुसऱ्या घटनेत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मोरे स्पोर्ट्स या बंद पडलेल्या कंपनीत भाऊसाहेब मतकर (वय 32 ,रा. नारेगाव परिसर) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

तिसऱ्या घटनेत मुकुंदवाडी परिसरातील स्वराज नगर येथे राहणाऱ्या पवन बाळू त्रिभुवन (वय 30) या युवकाने छताच्या पंख्याला दोरीच्या साह्याने बांधून गळफास घेतल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. चौथ्या घटनेत मयुरी मिसाळ (वय 20, रा. निसर्ग कॉलनी पेठे नगर) या तरुणीने बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वतःच्या पाइपला ओढणीने बांधून गळफास घेतला होता.
वरील चारही घटनांची नोंद अनुक्रमे सिडको, एमआयडीसी सिडको , मुकुंदवाडी आणि छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!