Share

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव गडगडला; रहाणे, शर्मासह एका मागे एक फलंदाज परतले

Published On: 

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 3 बाद 99 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती परंतु राहणे अवघ्या सात धावातच तंबूत परतला.

३८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहाणे बाद झाला. यानंतर, अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा रोहित शर्मा देखील लगेचच माघारी परतला. त्याने ९६ चेंडूत ६६ धावा काढल्या. आजच्या दिवसाची सुरुवातच भारतीय संघाची एका मागे एक धक्क्याने झाली आहे. विकेट्सचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे.

रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर मग अक्षर पटेल यांना संघासाठी चांगली धावसंख्या उभारता आली नाही. रिषभ पंत ८ चेंडूत १ धावांवर बाद झाला तर, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला खातं न उघडातच माघारी परतावं लागलं. सद्या, आर अश्विन व इशांत शर्मा हे फलंदाजी करत आहेत. १३४ धावांवर ८ बाद अशी भारताची स्थिती असून १९ धावांची आघाडी भारताने घेतली आहे. (ही धावसंख्या ४९ षटकापर्यंतची आहे)

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!