Share

मोबाईलवरुन झालेल्या वाादात चाकू भोसकल्याने तरुणाचा मृत्यू

Published On: 

लातूर : शहरातील राजीवनगर येथे गणेश कदम आणि संयम गटागट यांच्यात मोबईलवरुन शुल्लक वाद झाला. पण या दरम्यान वाद टोकाला गेला. संयम गटागट याने गणेश कदम याला चाकू भोसकला आणि यात गणेश कदम गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

राजीवनगर रोड येथील रहिवासी असलेल्या गणेश कदम हा सोमवारी रात्री हत्ते चौकात आला होता. यावेळी तिथे असलेल्या संयम गटागट यांच्या सोबत गणेश याचा मोबाईलच्या शुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यांच्यात बाचाबाची वाढत गेली आणि शिवीगाळही सुरु झाली. शिविगाळ केल्यानंतर हा वाद टोकाला गेला आणि संयम गटागट याने रागाच्या भरात गणेश याच्या पाठीत चाकून भोसकले. त्यामध्ये गणेश गंभीर जखमी झाला.

उपस्थितांनी तत्काळ गणेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गणेशला तपासुन मृत घोषीत केले. याबाबत पोलिस ठाण्यात गणेशचा भाऊ दत्ता रमेश कदम यांनी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी संयम टकाटक याला पोलिसांनी तातडीने आटक केली आहे. अधिक तपास लातूर उपविभागीय पोलिस आधिकारी जितेंद्र जगदाळे करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!