औरंगाबाद : मनपा तर्फे खामनदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिक तसेच मनपा यासाठी काम करीत आहे. त्यातच छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे यांनी पुढाकार घेत. खाम नदी काठी शनिवारी वृक्षारोपण केले.
खाम नदी पुनर्जीवित करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. हे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्याला चालना देण्यासाठी मनपा आयुक्तांनी लोकसहभागातून काम व्हावे यासाठी नागरिकांना आवाहन देखील केले होते. त्याला काही प्रमाणात नागरिकांनी देखील प्रतिसाद दिलाय. लोकसहभागातून हे कार्य पार पडणार आहे.
शनिवारी त्याचाच भाग म्हणून खाम नदी काठी वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, वाहतुक शाखेचे पोनि देशमुख, बेगमपुरा पो. ठा. निरीक्षक सानप, गरवारे बाल भवनचे संचालक सुनील सुतावणे, मिलिंद महाविद्यालयातील एनसीसीचे कॅडेट, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक, मनपा उद्यान कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी नदी पत्रातील प्लास्टिक मोठ्या प्रमाणात काढण्यात आले असून, जेसीबीच्या साहाय्याने नदी पात्र मोकळे करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
