मुंबई : राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.
यावरून प्रश्न विचारल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. मी आधीच तुम्हाला सांगितले आहे, मला या प्रकरणाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मी रात्री कुठे होतो आणि इथं कधी पोहोचलो, याबद्दल सगळं सांगितलं आहे. ज्यावेळी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारताय त्यावर मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर देतोय, माझ्याकडे अजून पूर्ण माहिती आली नाही, असं सांगितलं असल्यावर परत परत तोच प्रश्न का विचारला जात आहे. मी मंत्रालयात जाऊन संबंधित विभागाशी यावर माहिती घेईन’ असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “जर एखाद्या ट्विटवरुन ‘या’ सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत”
- ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला; प्रवीण दरेकरांचा घणाघात
- लग्नाचे आमिष दाखवून तरूणीला दारू पाजली; लॉजवर नेऊन केले गैरकृत्य
- अर्जुन तेंडुलकरला मोठा झटका; मुंबईच्या संघात मिळाले नाही स्थान
- तुळजापुरात शिवसेना, युवा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, छावासह शिवभक्तांचा एकत्र जल्लोष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
