Share

विरोधकांनी चालत्या गाडीतून आमचे सदस्य ओढत नेले, भाजपचा आरोप

Published On: 

औरंगाबाद : फुलंब्री ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ४६२ पैकी २४८ सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. यामध्ये आमच्या विरोधकांनी चालत्या गाडीतून सदस्य ओढत नेले, आम्ही कोणाला बळजबरी आमच्या पक्षात घेतले नाही’ असा दावा भाजपा तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केला.

नुकत्याच फुलंब्री तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात ८ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पद निवडीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या ताकदीने जास्तीत जास्त सरपंच, उपसरपंच व सदस्य भारतीय जनता पार्टीचेच निवडुन आले आहेत.

५३ पैकी ३० ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याची लिस्ट त्यांनी समोर आणली. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष राम बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

धामणगाव ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात, भाजपा की शिवसेना?
सरपंच निवडीत फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीत एकता ग्रामविकास पॅनलचे सदस्य निवडुन आले तरी ते महाविकास आघाडीचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात की सरपंच व उपसरपंच आमच्या पक्षाचे असा दावा करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!