🕒 1 min read
मुंबई- खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाईविरोधातील याचिका बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं अखेर मागे घेतली आहे.
खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केले आहेत. मात्र, घरात हा बदल करताना इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचं पालिकचं म्हणणं आहे. यासंबंधी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती.
या नोटिशीविरोधात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती.मात्र आता आपण बीएमसीविरोधातील खटला मागे घेत असून, नागरी संस्थेशी बोलून हे बेकायदा बांधकाम प्रकरण सोडवले जाईल, असं आज कंगनानं स्पष्ट केलं आहे.
मुंबई महापालिकेकडे बांधकाम नियमित करून घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मुंबई हायकोर्टात कंगनाने वकिलांमार्फत दिली आहे. आता कंगना सदर बांधकाम नियमित करून घेण्याची विनंती कंगना BMC कडे करणार आहे
यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगनाला ही मुभा देत, कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेने त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- राहुल गांधींनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत; फडणवीसांचं खुलं ‘चॅलेंज’
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
