Share

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात’

Published On: 

पुणे : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज (7 फेब्रुवारी) पुण्यातर गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या खटल्यावरुनही फटकेबाजी केली.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या आंदोलनावर देखील भाष्य केले आहे. दिल्लीतील शेतजाऱ्यांचं आंदोलन वस्तुस्थितीला धरून आहे’, अस ते म्हणाले. ‘कृषी हा विषय राज्याचाही आहे. काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा करण्यापासून राष्ट्रवादी, काँग्रेसला आम्ही थांबू शकलो नाही. मला काही लोकांनी दिल्लीत का जात नाही म्हणून विचारलं, पण माझा लढा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे’, असा घणाघात आंबेडकरांनी केला आहे.

‘महाराष्ट्रातील कायदा रद्द झाला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा राज्यावर अवलंबून केला जातो. नंतर केंद्राला अधिकार येत नाही. तीन पायाचे सरकारला हा कायदा रद्द करण्याची काय अडचण येते? हे कळत नाही. जमिनी वाचवायच्या असतील, ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंम’चा कायदा रद्द करायची गरज आहे. कोर्टात जाण्याच्या विषयच शिल्लक राहत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंम आणि शेती मालकांचा नेमका काय विषय हे जाहीर करायला हवं. पुन्हा सावकारकी सुरू होतील, आणि जमिनी जातील. एकदा हे झालं तर शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही”, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!