Share

रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तुळजापूर हे धार्मिक पर्यटन क्षेत्र रेल्वेच्या नकाशावर आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सोलापुर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव २२ जुलै २०१८ रोजी मंजूर केला. या रेल्वे मार्गासाठी लागणारा ५०% खर्च राज्य शासनाने उचलावा अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह यांनी केली आहे.

सोलापूरहून तुळजापूर मार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या ८४ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी ९०४ कोटी खर्च अपेक्षित आहे. उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गामुळे राज्यातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक तुळजापूर तिर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येईल. हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाच्या खर्चापैकी ५०% टक्के हिस्सा राज्य सरकारने केद्रींय रेल्वे बोर्डास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ स्तरावर घेतला आहे.

याप्रमाणेच राज्य सरकारने सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या खर्चासाठी ५०% टक्के खर्च राज्य शासनाने उचलावा या मागणीसाठी सातत्याने पाठपूरावा करत आहोत. महाराष्ट्र सरकारचे ५०% हिस्सा उचलणे बाबत संमती पत्र रेल्वे बोर्डाकडे उपलब्ध नाही. या निवेदनासोबत रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता यांचे ८ जानेवारी २०२१ चे पत्र सोबत जोडले आहे. रेल्वे मार्गाच्या ५०% खर्च उचलण्याचा निर्णय आणि संमतीपत्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापुर्वी घ्यावा असे राणाजगजितसिंह यांनी म्हणले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!