🕒 1 min read
मुंबई – कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता.कालच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते.’भेंडी बाजारातील महिला शेतकरी कधी पासून झाल्या ? अशी टिका परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. काल ज्या महिला आझाद मैदावर उपस्थित होत्या त्या महिला भेंडी बाजारातील होत्या मग त्या महिला आजच्या मोर्चात सहभागी कशा झाल्या होत्या, असा दावा दरेकर यांनी केला.
शेतकरी मोर्चाचे शिष्ठमंडळ आज राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार होते. परंतु राज्यापालांच्या पुर्व नियोजित कार्यक्रमामुळे ते राजभवनावर उपस्थित नाहीत.परंतु राज्यपालांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, अशी टिका या आंदोलक शेतकऱ्यांकड़ून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांची काही राजकीय पक्षांकडून दिशाभुल होत आहे. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे संवेदनशील आहेत. ते सगळ्यांना भेटतात त्यांच्यावर विनाकारण टीका नको. कोरोना संकट काळात राज्यपालांचे काम संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. राज्यपालांकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून गोव्यातील अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे नियोजन चार महिन्यापुर्वीच करण्यात आले होते. विधीमंडळाचे कार्यक्रम चार महिन्यांआधी ठरतात हे सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना विधामंडळाच्या नियोजनाची माहिती नाही का? झोपलेल्या लोकांना उठवता येतं, परंतु झोपेचे सोंग केलेल्यांना उठवता येत नाही,असं म्हणत दरेकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला.
शेतकरी आंदोलनाच्या मागे असलेल्या नेत्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आंदोलन करणाऱ्या नेत्यांना खरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करावा वाटतोय. @BJP4Maharashtra @TV9Marathi @abpmajhatv @LoksattaLive pic.twitter.com/vucFxrjEHV
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 25, 2021
शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होतोय,पूर्ण पणे शेतकऱ्यांच्या विषयी ढोंग या मंडळींचं सुरू आहे. शरद पवारांची भूमिका सातत्याने बदलत असते हे सगळ्यांनी पाहिलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते मोर्चाला न गेल्याने त्यांची भूमिका बदललेली दिसत आहे. शिवसेनेनं त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले दुबईत साजरा करणार भारतीय प्रजासत्ताक दिन
- अभिमानास्पद ! राज्यातील ५७ शूर पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान
- ‘जीएसटी’तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा देशव्यापी एल्गार
- ‘शौर्य, धैर्याची महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली’ ; मुख्यमंत्र्यांनी केले पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
- जय हिंद…पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
