🕒 1 min read
मुंबई :- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. मनसे आणि भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
जेव्हा प्रश्न छत्रपती शंभूराजांचा असतो, औरंगाबादच्या नामांतराचा असतो, तेव्हा छत्रपतींच्या नावाने दुकानदारी करणारे बोलभांड कुठल्या बिळात लपतात ते महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेला बरोबर ठाऊक आहे. pic.twitter.com/wEnQwMAAaj
— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) January 4, 2021
भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. जेव्हा प्रश्न छत्रपती शंभूराजांचा असतो, औरंगाबादच्या नामांतराचा असतो, तेव्हा छत्रपतींच्या नावाने दुकानदारी करणारे बोलभांड कुठल्या बिळात लपतात ते महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेला बरोबर ठाऊक आहे असं म्हणत सेनेवर तोफ डागली आहे.
After #Congress now Samajwadi Party says "Aurangazeb"…. #Aurangabad . Now CM #UddhavThackeray has to decide they believes "HinduHruday Samrat" or
" #Shivsena ka Bhagva ab Hara Ho Gaya Hai" @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/IYx4vlwYXT
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 4, 2021
दरम्यान, औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
- “जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी”
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन
- मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेला सुरुहोण्यापूर्वीच घरघर
- कॉंग्रेसचा शिवसेनेला धक्का; शिवबंधन तोडत ‘या’ नेत्याने घेतला कॉंग्रेसचा झेंडा हाती
- ‘ज्यांनी कायद्याचे पालन करायचे असते तेच अशा लग्नसोहळ्याला उपस्थित राहून कायद्याची पायमल्ली करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
