🕒 1 min read
मुंबई : नुकत्याच बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं असून अवघ्या १ स्थानाच्या फरकाने भाजप बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आहे. तर, भाजप-जेडीयू युतीला बहुमत मिळालं असून सत्तास्थापनेसाठी ते दावेदार बनले आहेत.
बिहार निवडणुकांची जबाबदारी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. त्यामुळे बिहारमधील विजया मागे देवेंद्र फडणवीसांचा देखील वाटा आहे. अशातच आता, बिहारमधील फडणवीसांच्या कामगिरीनंतर भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांकडे आणखी काही राज्याच्या नव्या जबाबदाऱ्या सोपवतं विश्वास दाखवला आहे.
भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. तर मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच, नाराज असलेले ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला दणका देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इतर नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न आता भाजपकडून सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्या नाराजीचे चर्चे असतानाच त्यांच्या राजकीय पुनर्वसन रोग्या पद्धतीने करण्यासाठी भाजपने ही जबाबदारी सोपवल्याचं देखील बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
- यंदाच्या दिवाळीत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
- …अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
- रिपब्लिक टीव्हीचा भाजपशी थेट संबंध असल्याने फडणविसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपले !
- ‘विरोधकांच्या अघोरी प्रयत्नांना पुरून सरकारने वर्षपूर्ती केली’; संजय राऊतांचा भाजपला टोला
- व्यर्थ न जाओ बलिदान : अवघ्या वीसाव्या भारत मातेसाठी जीवन केले अर्पण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
