Share

‘विरोधकांच्या अघोरी प्रयत्नांना पुरून सरकारने वर्षपूर्ती केली’; संजय राऊतांचा भाजपला टोला

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या संकटावर मात करून यंदाची दिवाळी राज्यभरात साजरी केली जात आहे. याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारला देखील वर्षपूर्ती देखील होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘राज्यात कोरोना नसता तर अधिक उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात आली असती. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक संकटांशी सामना करून सरकारची वर्षपूर्ती केली आहे. हे सरकार अस्थिर कारण्याचे अनेक अघोरी प्रयोग विरोधकांनी केले असले तरी त्या सगळ्यांना पुरून उरून या सरकारने वर्षपूर्ती केली आहे.’ असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.

‘अनेक नैसर्गिक संकटे आपल्यावर आली. परंपरेने आज नरकासुराचा वध केला असून महाराष्ट्रासाठी आणि सरकारसाठी आजपासून मंगल आणि शुभदिवस चालू होत आहेत. यासोबतच, पुढे उरलेली चार वर्षे देखील फक्त महाराष्ट्राचा विकास, जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्राने राष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं जाईल असं अशा पद्धतीने या सरकारच काम असेल अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.’ असं देखील संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!