Share

महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- हाथरस प्रकरणाबाबत देशात तीव्र संताप वाढला चालला आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. योगी सरकारने कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून आणि ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तिथेली माता भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचं राहिल, असा सल्ला विरोधक आता भाजपला देऊ लागले आहेत.

देशात अराजक माजलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. यूपीत कायद्याचं राज्य नाही. दडपशाही सुरू आहे, असं सुनावतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी असून योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकाराबद्दल स्वत:ची चूक कबूल करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत असे मत केंद्रीय महिला आणि स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं.एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, महिलांची संख्या ही समाजात अर्ध्या स्वरूपात जरी असली तरी त्यांचा प्रभाव समाज, राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर असतो. भारताने आपल्या विकासात सर्व स्तरांवर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदल स्वीकारत आम्ही लोकसभा निवडणुकीच्यावेळी महिलांच्या विकासाठी करण्यात आलेल्या आश्वासनांना पार करत पुढे गेलो आहोत असे स्मृती इराणी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!