🕒 1 min read
पुणे : कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली दिसत नाही का? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा संतप्त सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे. गतवर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा ‘स्तुत्य उपक्रम’ राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का आरसा धरत नाही? अशी खोचक टीका शेलार यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून कोकणातून परतीच्या प्रवासात असणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. भाजप सरकारच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कालबद्द कार्यक्रम हाती घेण्यात आला असतानाही त्यावेळी राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा असे आंदोलन करुन राजकारण केले होते. यावेळी मुंबई सह महाराष्ट्रभरातील रस्त्यावरील खड्डे बुजवले तर नाहीच, शिवाय कोकणात तर अख्खा रस्ता उखडून गेला, मग राष्ट्रवादी सेल्फीचा तो ‘स्तुत्य उपक्रम’ का राबवत नाही? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज सरकारला का ऐकू येत नाही? असे सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे पत्र लिहून लक्षही वेधले आहे.
गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा "स्तुत्य उपक्रम" का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? pic.twitter.com/5FBVSGVeyj
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 30, 2020
दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी महिला काँगेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लबोल केला आहे. ‘रस्त्यात खड्डे दाखवा हजार रुपये मिळावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ते सत्तेत असताना केले होते.आशिष शेलार यांनी जरी हा प्रश्न खा.सुप्रियाताई आणि मुख्यमंत्री यांना विचारला असला तरी मला वाटतं की मागील सरकारच्या काळातील खड्डे दाखवल्याबद्दल बक्षिसाची रक्कम बाकी राहिल्याची आठवण तर चंद्रकांत पाटील यांना शेलार करून देत नसतील ना ? असा घणाघात रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
रस्त्यात खड्डे दाखवा हजार रुपये मिळावा असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ते सत्तेत असताना केले होते.आशिष शेलार यांनी जरी हा प्रश्न खा.सुप्रियाताई आणि मुख्यमंत्री यांना विचारला असला तरी (1/2) @MHVaghadi @OfficeofUT @supriya_sule
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 31, 2020
मला वाटतं की मागील सरकार च्या काळातील खड्डे दाखवल्याबद्दल बक्षिसाची रक्कम बाकी राहिल्याची आठवण तर चंद्रकांत पाटील यांना शेलार करून देत नसतील ना ?
शेलार यांना रस्त्यावरील पडलेले खड्डे दिसतात.(2/3)@ChDadaPatil @ShelarAshish— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 31, 2020
तर, ‘महाराष्ट्राच्या हक्काच्या GST चा परतावा न दिल्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीला पडलेलं कृष्णविवर दिसत नाहीये, शेलारानी हिच ताकत महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी लावावी मग असले टुकार स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही..!’ असा टोला देखील रुपाली चाकणकर यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे.
पण महाराष्ट्राच्या हक्काच्या GST चा परतावा न दिल्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीला पडलेलं कृष्णविवर दिसत नाहीये,शेलारानी हिच ताकत महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी लावावी मग असले टुकार स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही..!(3/4)#कहीं_निगाहें_कहीं_पे_निशाना #ShamelessBJP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 31, 2020
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी लिहिलेल्या या पत्रात आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, महा विकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली. वेळीच ई-पास उपलब्ध करुन दिले नाहीत, एसटी उपलब्ध करुन दिली नाही, रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीच केली नाही. क्वारंटाईन कालावधी व आरोग्याच्या उपाय योजना याबाबत सरपंच व कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्याशी वेळीच चर्चा केली नाही. अशा सरकारच्या आडमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहचला त्या चाकरमान्यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्यांनी जीव मेटाकुटीस आणला.
गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी हा ‘स्तुत्य उपक्रम’ का राबवत नाही?
मुंबई- गोवा महामार्ग पनवेल पासून चिपळूणपर्यंत पुर्णपणे उखडून गेलेला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेली नाही. सर्वत्र खड्डे, खडी अशा अवस्थेत हा महामार्ग असून रस्त्या शिल्लक राहिलेला नाही. खेड्यातील कच्च्या रस्त्यांपेक्षा वाईट व दयनीय अवस्था या महामार्गाची झालेली आहे.
दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजविण्यात येतात. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांचा प्रवासात कंबरेचे आजार होतील की काय? अशी भिती वाटत आहे. कोकणच्या रस्त्याकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल, कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल आम्ही निषेध करतो, असे सांगत किमान आता तरी रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी आमदार अँड.आशिष शेलार यांनी केली आहे.
सैन्य भारतमातेच्या सुरक्षेसाठी तय्यार, पण मोदींचे ‘लाल आँखे’ कधी दिसणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

