Share

…तर महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवर, बौद्धांवर अत्याचार वाढले आहेत. दलितांवरील अत्याचार थांबवा जर दलितांवरील वाढते अत्याचार थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी सरकारने सत्तेतून बाहेर पडावे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दलितांवरील वाढते अत्याचार थांबवा, दलितांना संरक्षण द्या, न्याय द्या या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे अत्यंत शिस्तीत फिजिकल डिस्टन्स पाळून शांततेत आंदोलन करण्यात आले. यावेळी राजगृहावर झालेल्या तोडफोडीचा देखील निषेध करण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

परीक्षांबाबत घेतलेला निर्णय हास्यास्पद,एचआरडी आणि यूजीसीवाले दुसऱ्या विश्वातून आले आहेत काय ?

घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. माता रमाबाई आंबेडकर नगरात 11 जुलै 1997 रोजी झालेल्या गोळीबारकांडात शहीद झालेल्या 10 भीमसैनिकांच्या 23 व्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमांना रामदास आठवले यांनी यावेळी अभिवादन केले. 11 जुलै 1997 रोजी माता रमाबाई आंबेडकर नगरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला त्यात 10 भीमसैनिक शहिद झाले. त्या शहिदांच्या 23 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज 11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.

दलितांवरील अत्याचार थांबवा दलितांना न्याय द्या अन्यथा महाविकास आघाडीने सत्तेत राहू असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब गरुड, संदेश मोरे यांच्या नेतृत्वात घाटकोपर पश्चिम सर्वोदय सिग्नल येथे आंदोलन करण्यात आले. तसेच घाटकोपर पूर्व पंतनगर येथे विनय आचरेकर अमिना खान, भारती गुरव, वर्षा लाड, पप्पू मोहिते, बाळू निकम, चंद्रकांत न्यायनिर्गुने, अजित बनसोडे, अनिल जाधव, मुलुंडमध्ये योगेश शिलवंत, सुर्यनगर विक्रोळीमध्ये राजेश यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.

धारावीतील कोरोना कंट्रोलप्रकरणी किरीट सोमय्यांनी केली प्रशासनाची पोल-खोल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!