औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात राज्यात ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, असे असले तरी राज्यातील नागरिक कोरोनाबाबत अद्याप सावध झालेले दिसत नाही.
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधत कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर, नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची तयारी असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. मात्र, असे असतानाही राज्यात अनेक राजकीय आणि सांस्कृतीक कार्यक्रम सुरूच असल्याचं दिसून येतय. रस्त्यावरही लोक मास्क न लावताना फिरतांना दिसत आहे.
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ६ हजार ९७१ कोरोना रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर २ हजार ४१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, या सर्वात २४ तासातील मृत्यूचा आकडा ३५ रुग्णांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ५१ हजार ७८८ वर पोहोचली आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येतही वाढ झाली असून सध्या ५२ हजार ९५६ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत, ना दिलासा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

