मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संबोधनातून त्यांनी कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी, पोस्ट कोव्हिडचे परिणाम यांसह अनेक विषयांवर मते मांडली. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मनसेने जोरदार टीका केली. बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 23, 2020
वाढती कोरोना रुग्णसंख्या, शाळा सुरु करणे, लोकल, वाढीव वीजबिलात दिलासा व इतर अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार का? याकडं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष्य लागलं होत. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री ८ वाजता जनतेसोबत संवाद साधला. त्यामुळे ते कोणत्या विषयावर बोलणार यावरून चर्चा रंगल्या होत्या. पण वाढीव विजबीलासारखा ऐरणीवर असलेल्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणं टाळलं अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
दरम्यान आज वाढीव वीज बिल विरोधात भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाच भडका पाहायला मिळत आहे. भाजप कार्यकर्ते आज वीज बिलांची होळी करणार असून, राज्यभरात होळी पेटवून आंदोलन सुरु केले आहे. पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाढीव वीज बिल विरोधात आंदोलनाचा भडका; भाजप आज वीज बिलांची पेटवणार होळी
- ‘…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल’ : रामदास आठवले
- वीजबिल मागणाऱ्या सरकारला अस्सल कोल्हापुरी तेल लावलेलं पायताण होतंय व्हायरल!
- पवारांवरील टीकेनंतर मिटकरींचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, ‘कोल्हापुरातून हाकललेल्यासाठी…’
- ‘सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील मतिमंद आणि मानसिक रुग्णासारखी वक्तव्य करत आहेत’


