Share

कोरोनीलवर बंदी घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रातील प्लास्टिक,गुटखाबंदीबाबत गंभीर का नाहीत ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रामदेव बाबांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मोठा झटका दिला आहे. आयएमएने पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे.

हे औषध एवढ्या घाईने बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नसल्याचे सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केल्यामुळे रामदेव बाबांची चांगलीच कोंडी झाली आहे.

दरम्यान,नियमानुसार बाबांच्या या औषधावर बंदी घातली असेल तर याचे स्वागत करावेच लागले मात्र महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी आहे,गुटख्यावर बंदी आहे अनेक अमली पदार्थांवर सुद्धा बंदी असूनही याची सर्रासपणे विक्री होताना दिसते याबाबत गृहमंत्री म्हणून काय भूमिका आहे देशमुखांची हे समजले तर अधिक उत्तम होईल. कारण महाराष्ट्रातील हजारो तरुण आज या विषारी व्यसनाच्या विळख्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे.

व्यसनाधीन तरुणांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे का ? गृहमंत्री म्हणून देशमुखांची नव्हे का ? जेवढी तत्परता बाबांच्या या औषधावर बंदी घालण्यासाठी केली तेवढी तत्परता गुटख्याच्या विक्री करत असलेल्यांवर कारवाई करण्यसाठी का दाखवली जात नाही हा सवाल आज उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!