🕒 1 min read
मुंबई : ‘मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ?, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? ,’ असे सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारले आहे. तसेच ‘केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना!,’ असा इशारा शेलार यांनी दिला आहे.
मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ? हे सांगा,
मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? हे सांगा
मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा
मुंबई पुरामुळे तुंबणार नाही,
याची हमी द्या!!
केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेतच…आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना! 2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 14, 2020
तसेच पुढे शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना शेलार म्हणतात, ‘देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!’.
देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!
तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?
हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला! 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 14, 2020
मात्र तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?, हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, 4 चे सूतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही?, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
