Share

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय कराल ?

Published On: 

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा सामना करणे गरजेचे असते.उन्हाळ्यात निरामय आरोग्यासाठी

  खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या…

  • उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा अधिक असते.त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
  •  दिवसभरातून पाण्याबरोबरच लिंबू सरबत,ताक,लस्सी,नीरा,शहाळे आदी द्रव पदार्थांचे प्रमाणही वाढवावे.त्यातून शरीराला पाण्याव्यतिरिक्त आवश्यक असणारे घटकही मिळू शकतात.
  • उन्हाळ्यात कलिंगड,खरबूज,द्राक्षे आदी रसदार फळे खावीत.कलिंगडामध्ये पाणी आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.खरबूजामध्ये अ,क जीवनसत्त्वे,लोह,सोडिअम,पोटॅशिअम असते.
  • उन्हाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते.त्यामुळे,पचायला हलका आहार घ्यावा.त्याचप्रमाणे,उष्ण व कोरड्या ऋतूचा त्रास टाळण्यासाठी  मांसाहार,तिखट व मसालेदार पदार्थही टाळावेत.तसेच चहा,काॅफीबरोबरच मद्यसेवनही टाळावे.
  • उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.साधारनपणे दहा मिनिटे शांत बसल्यावर सावकाश घोटघोप पाणी प्यावे.माठातील नैसर्गिकरीत्या झालेले थंड पाणी प्यावे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!