🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – काल जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. असं असताना देखील पाकिस्तानकडून मात्र स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
भारतात झालेला दहशतवादी हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून, या आरोपांशी काहीही पडताळणी न करता पाकिस्तानचं नाव जोडू नका असं म्हटलं आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात हे विधान करण्यात आलं आहे.
पाकिस्तान नेहमीच जगाच्या कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या हिंसक घटनांचा विरोध केला आहे ही बाब समोर आणत भारतीय माध्यमं आणि शासनाकडून लावण्यात येणारे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

