नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) विश्वास आहे की त्यांचा संघ अजूनही सेंच्युरियन कसोटी सामना जिंकू शकतो. सेंच्युरियनमध्ये कोणत्याही संघाने 305 धावांचा पाठलाग केला नाही आणि दक्षिण आफ्रिका अजूनही 4 गडी गमावून 211 धावांनी मागे आहे. पण रबाडाने यावेळी असा विश्वास व्यक्त केला आहे की, त्याचा संघ या परिस्थितीतही चांगला खेळू शकतो.
रबाडा म्हणाला, “आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही रणनीती बनवू आणि लक्ष्य कसे गाठता येईल यावर काम करू. दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूला स्वत:वर विश्वास ठेवायला हवा की आपण अजूनही भारताला हरवू शकतो. प्रोटीजने चौथ्या दिवशी तिसऱ्या डावात अवघ्या 94 धावांत 4 विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही 211 धावांनी मागे आहे.
टीम इंडियाने चौथ्या दिवशीच्या सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या. अशा स्थितीत आता त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज आहे. भारताला अजून 6 विकेट घ्यायच्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

