Share

‘आम्ही अजूनही भारताला हरवू शकतो’, द. आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने व्यक्त केला विश्वास

Published On: 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) विश्वास आहे की त्यांचा संघ अजूनही सेंच्युरियन कसोटी सामना जिंकू शकतो. सेंच्युरियनमध्ये कोणत्याही संघाने 305 धावांचा पाठलाग केला नाही आणि दक्षिण आफ्रिका अजूनही 4 गडी गमावून 211 धावांनी मागे आहे. पण रबाडाने यावेळी असा विश्वास व्यक्त केला आहे की, त्याचा संघ या परिस्थितीतही चांगला खेळू शकतो.

रबाडा म्हणाला, “आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही रणनीती बनवू आणि लक्ष्य कसे गाठता येईल यावर काम करू. दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूला स्वत:वर विश्वास ठेवायला हवा की आपण अजूनही भारताला हरवू शकतो. प्रोटीजने चौथ्या दिवशी तिसऱ्या डावात अवघ्या 94 धावांत 4 विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही 211 धावांनी मागे आहे.

टीम इंडियाने चौथ्या दिवशीच्या सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या. अशा स्थितीत आता त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज आहे. भारताला अजून 6 विकेट घ्यायच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!