कानपूर: युवा फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने कानपूर कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ही कामगिरी केली. आता श्रेयसच्या या शतकानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. आता यावरच भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) ट्विटरवर पोस्ट करत स्वतः लाच ट्रोल केले आहे.
जर मुंबईच्या फलंदाजाने टीम इंडियासाठी पदार्पण केले, तर तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावतो, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र भारताचा माजी सलामीवीर आणि मुंबईकडून खेळलेला वसीम जाफरने याप्रकरणी दुःख व्यक्त केले. मुंबईचे सर्वच फलंदाज पदार्पणात शतक झळकावत नाहीत, हे त्याने एका मीमद्वारे सांगितले. वसीम जाफरने ”मै हू ना” य़ा बॉलीवूड चित्रपटातील एका संवादाद्वारे स्वत: लाच ट्रोल केले आहे.
Ye troll humne khud ko kiya hai ???? #INDvNZ #Iyer pic.twitter.com/DAymMq4TiE
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 26, 2021
दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा दुसरा दिवस आहे. लंचनंतर भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. शुभमन गिलने 52 आणि रवींद्र जडेजाने 50 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 5 विकेट घेतल्या. किवी संघाचा पहिला डाव सुरु झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- ‘त्यांच्या’ एका फोनमुळे मला माघार घ्यावी लागली; अमल महाडिकांची खंत
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…


