Share

शेतकरी विविध मागण्यासाठी आजपासून पुन्हा रस्त्यावर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

१ नोव्हेंबरपासून राज्यभरात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

या आंदोलनात महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकणे, तसेच तोडलेली वीजजोडणी शेतकऱ्यांनी स्वतः जोडून घेणे, असे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सुकाणू समितीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत मंगळवारी बैठक झाली. यावेळी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनांची माहिती देण्यात आली.

आज, १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत तीन टप्प्यांत राज्यभरात तीन प्रकारची आंदोलने करण्याचा इशारा समितीने दिला आहे. नोटाबंदीचा निषेध करण्यासाठी ८ नोव्हेंबरला सर्व तहसील कचेऱ्या व बँकासमोर शेतकरी सरकारचे वर्षश्राद्ध घालतील, असा इशारा समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!